“मन की बातमधून प्रसिद्धी मिळवणाऱ्या कल्याणी पाटील यांचा दिल्ली प्रवास”

कल्याणी पाटील यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण

 

शिरूड (ता. अमळनेर) येथील उपसरपंच कल्याणी पाटील यांना पंतप्रधान कार्यालयाकडून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाले आहे. यापूर्वी “मन की बात” कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सेंद्रिय शेती व जलसंधारणातील कार्याचा विशेष उल्लेख केला होता.

 

कल्याणी पाटील यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून विषमुक्त शेतीला प्रोत्साहन दिले आणि महिलांना सेंद्रिय शेतीत सहभागी करून घेतले. “अटल भूजल” योजनेअंतर्गत गावात जलसंधारणासाठी २० रिचार्ज शाफ्ट तयार झाले असून आणखी मंजूर आहेत.

 

त्या पती प्रफुल्ल पाटील यांच्यासोबत २५ जानेवारी रोजी दिल्लीला रवाना होऊन २८ जानेवारीला परतणार आहेत. ग्रामीण विकासातील त्यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे.

India@2022

  • Related Posts

    अमळनेर तालुक्यात निवडक शेतकरी गटांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर मंगळग्रह सेवा संस्था व पानी फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम

    अमळनेर (ता. प्रतिनिधी) – महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या पानी फाऊंडेशनच्या पुढाकाराने अमळनेर तालुक्यातील निवडक शेतकरी गटांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण मंगळग्रह सेवा संस्थेच्या…

    “संपत्ती व उत्पादन केंद्रीकरणाचा धोका: संविधान जागरूकता कार्यशाळेत डॉ. लीलाधर पाटील यांचे मार्गदर्शन”

    संपत्तीचे आणि उत्पादनाचे केंद्रीकरण हा सर्वात मोठा धोका प्राचार्य ,डॉ.लीलाधर पाटील संपत्तीचे आणि उत्पादन साधनांचे एकत्रीकरण होऊन, सामूहिक हितास बाधा येईल अशा प्रकारे आर्थिक यंत्रणा राबविता कामा नये .एकाच व्यक्तीच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!