
कल्याणी पाटील यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण
शिरूड (ता. अमळनेर) येथील उपसरपंच कल्याणी पाटील यांना पंतप्रधान कार्यालयाकडून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाले आहे. यापूर्वी “मन की बात” कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सेंद्रिय शेती व जलसंधारणातील कार्याचा विशेष उल्लेख केला होता.
कल्याणी पाटील यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून विषमुक्त शेतीला प्रोत्साहन दिले आणि महिलांना सेंद्रिय शेतीत सहभागी करून घेतले. “अटल भूजल” योजनेअंतर्गत गावात जलसंधारणासाठी २० रिचार्ज शाफ्ट तयार झाले असून आणखी मंजूर आहेत.
त्या पती प्रफुल्ल पाटील यांच्यासोबत २५ जानेवारी रोजी दिल्लीला रवाना होऊन २८ जानेवारीला परतणार आहेत. ग्रामीण विकासातील त्यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे.